मुख्य सामग्रीवर वगळा

पुणे ते अकोला प्रवास - एक विचार

नमस्कार मित्रांनो,

आज पुष्कळ दिवसानंतर लिहायला घेतलंय. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक सुभेच्छा! 
आज मला थोड्या वेगळ्या विषयावर बोलायचं आहे. मी काही दिवसांपूर्वी अकोल्याला जातांना मला ऑफिस मध्ये उशीर झाल्यामुळे माझी ट्रेन सुटली. त्यामुळे मग मी बस ने जायचा विचार केला. मला रात्री वेळेवर तिकीट मिळेना. मग मी शिवाजीनगर बस स्थानकावर गेलो. तेंव्हा मला पुणे ते औरंगाबाद अशी 'शिवनेरी' बस मिळाली. फार बरे वाटले. कमीत कमी ६ तास तरी चांगली झोप होईल म्हणून थोडा खुश झालो. पुढे पहाटे औरंगाबाद ला उतरल्यावर परत पुणे-अकोला लाल डब्बा गाडी मिळाली. रात्रीच्या वेळेस औरंगाबादला ती बर्यापैकी खाली झाली होती व मला खिडकी शेजारी जागा मिळाली. 
मग मी जेंव्हा विचार केला तेंव्हा वाटले की शिवनेरी बस औरंगाबाद-अकोला का नाही? का म्हणून शिवनेरी बसेस केवळ मुंबई व पुणे ह्या शहरांच्या आजूबाजूला चालतात? पुणे-अकोला-नागपूर असा प्रवास करणारे कितीतरी प्रवासी आहेत. त्यामुळेच पुणे-नागपूर अशा कितीतरी खाजगी बसेस रोज चालतात. सध्या स्थितीत मुंबई-पुणे, पुणे-कोल्हापूर, पुणे-औरंगाबाद, पुणे-नाशिक अशा ठिकाणी शिवनेरी बसेस आहेत. शिवाय ह्या सर्व मार्गांवर व पुणे-सातारा, पुणे-सांगली, पुणे-बारामती अशा विनावाहक, विना-थांबा, निमाराम (एशियाड) बसेस धावतात. मग मुंबई पुनेपासून सुरु होऊन, कोल्हापूर व जास्तीतजास्त औरंगाबाद पर्यंत महाराष्ट्र संपतो का? मग औरंगाबाद-अकोला, अकोला-नागपूर, अकोला-नांदेड, नागपूर-नांदेड अशा रस्त्यांवर शिवनेरी बसेस का नाहीत? कमीत कमी पुणे, औरंगाबाद मध्ये विदर्भातील लोकांची संख्या पाहता व त्यांची आर्थिक स्थिती बघता अशा बसेस चालवणे पुणे-औरंगाबाद किंवा पुणे-कोल्हापूर पेक्षा नक्कीच कमी प्रवासी असणार नाहीत. बरं ह्या मार्गांवर विनावाहक-विनाथांबा निमआरम बसेस चालविण्यात काहीच हरकत नसावी. 
ह्याचे कारण विचार करता करता अकोल्याला कधी पोहोचलो हे कळले नाही व मी उतरलो. 
पण काही गोष्टी प्रकर्षाने वाटल्या त्या इथे नमूद करावाश्या वाटतात: 
१. आपण महाराष्ट्र हे एक राज्य म्हणून व कुठ्यालाही भागांमध्ये भेदभाव न करता कधी वागणार? कधी पर्यंत आपण स्वतःच आपल्या महाराष्ट्राचे कोंकण, मराठवाडा, विदर्भ अशे तुकडे पाडत राहणार?
२. एखादी चांगली योजना असेल तर ती महाराष्ट्राच्या सर्व भागात लावावी जेणेकरून सर्व भागांत त्याची फळे मिळतील. 
३. पुणे-औरंगाबाद, औरंगाबाद-अकोला, अकोला-नागपूर हे सर्व मार्ग प्रत्येकी ५/६ तासांचे आहेत, त्यामुळे अशा तीन भागांत शिवनेरी बसेस चालविणे एकदम योग्य होईल. 
४. मराठवाडा, विदर्भातील लोकांची पुण्यात संख्या पाहता ह्या सगळ्या बसेस चांगल्या भरून वाहतील अशी खात्री वाटते. 
५. त्यामुळे महाराष्ट्राच्या कुठल्याही टोकावरून दुसर्या टोकाला जाण्यासाठी शिवनेरी बसेस चा पर्याय उपलब्ध होईल. कोल्हापूर ते नागपूर, कोल्हापूर ते मुंबई (हे आधीच आहे), मुंबई ते नागपूर हे सर्व कोपरे चांगल्या दर्जाच्या सरकारी बसेस ने कनेक्ट होतील.
६. शिवाय औरंगाबाद-अकोला, अकोला-नागपूर, नागपूर-नांदेड, अकोला-नांदेड, अमरावती-चंद्रपूर, सोलापूर-लातूर कोल्हापूर-रत्नागिरी, अशा मार्गांवर विनावाहक-विनाथांबा निम आराम बसेस चालवाव्यात.
७. ह्यासाठी विदर्भ, मराठवाडा, कोंकण अशा सर्व भागाच्या लोकप्रतिनिधींनी मागणी करावी. आपण सामान्य लोकांनी सुद्धा ह्यासाठी आपला आवाज उठविला पाहिजे. 
८. मुंबई वरून बाहेरच्या राज्यांत अशा बसेस सुरु करण्याआधी आपल्या राज्यात सर्व भाग ह्याने जोडायला पाहिजे अशी माफक अपेक्षा सरकार कडून होती. 

मला स्वतःला विदर्भ, मराठवाडा, कोंकण अशी विभागणी करणे आवडत नाही, पण कधी कधी आपल्या सभोवतालची परिस्थिती पाहून तुलना करायची इच्छा राहवत नाही. ह्यासाठी आता आपण लोकांनीच आपल्या मागण्या जोरदार लावून धरल्या पाहिजेत. 

ह्याबाबत तुम्हाला काही बोलायचे असल्यास जरूर प्रतिक्रिया द्या. 

राम राम,
अकोलकर

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

|| शेगाव व वर्हाडातील इतर देवस्थाने ||

मित्रांनो नमस्कार, आज जवळ जवळ महाराष्ट्रातील प्रत्येकाला शेगावीचे श्री. गजानन महाराज माहित असतील. अक्खा महाराष्ट्र श्री संत गजानन महाराजांना पुजतो व त्यांचे आशीर्वाद मागतो. महाराष्ट्र ही सदैव संतांची भूमी राहिली आहे. तरीही काही संत देवस्थानाशी पोहोचले व देवच होऊनी गेले. त्यांना श्री भगवंताचे रूप मानले गेले. जसे अक्कलकोटचे श्री. स्वामी समर्थ, शिर्डीचे श्री. साईबाबा, आळंदीचे श्री. ज्ञानेश्वर माउली, देहूचे श्री. संत तुकाराम महाराज. तसेच शेगावीचे श्री.  संत गजानन बाबा! मी जेंव्हा जेंव्हा शेगावला जातो, तेंव्हा तेंव्हा मला संपूर्ण महाराष्ट्रातून दर्शनासाठी आलेले भक्त दिसतात. महाराष्ट्राच्या काना कोपर्यातून (कोल्हापूर, सोलापूर, मुंबई, रत्नागिरी सारख्या ठिकाणांवरून ) इथे दर्शनासाठी आलेले भक्तगण पाहता अचंबा वाटतो... व शेगाव म्हणजे प्रती पंढरपुरच असे जाणवते! पण आपण संस्थानाच्या आत प्रवेश केल्यानंतर थोड्याच वेळात आपल्याला त्याचे कारण कळून चुकते. आत प्रवेशद्वारापासूनच संपूर्ण...

श्रावणातील अकोल्याचे राजराजेश्वर आणि कावड उत्सव !!

श्रावणातील अकोल्याचे राजराजेश्वर आणि कावड उत्सव !! नमस्कार मित्रहो! खूप दिवसांपासून मी ब्लोगवर आलो नाहीये. मागच्या एक महिन्यात कार्यालयात खूप काम असल्यामुळे वेळच नाही मिळाला. आज खूप दिवसांपासून ब्लोग लिहायची इच्छा पूर्ण करतोय. श्रावण महिना मला तसा खूपच आवडतो आणि मला खात्री आहे कि तुम्हा सर्वांना सुद्धा तो खूप आवडत असावा। पूर्वी   श्रावणातील दर सोमवारी अकोल्यातील श्रीराजराजेश्वर दर्शन करणे म्हणजे एक मुख्य काम असे।    आमचे आवडीचे... आणि आमचेच नाहीतर सर्व अकोलेकरांचे। श्रावणातील दर सोमवारी इथे एक   मोठा  उत्सवाच असतो। अकोलेकारांची भाविकता ह्यावेळेस प्रकर्षाने दिसून येते। पतेच 4-5 वाजतापासून अकोलेकर आणि आजूबाजूच्या परिसरातील भाविक पायी मंदिराकडे जाण्यास निघतात। 'जय श्री राजराजेश्वर', ' जय भोले', 'ओम नमः शिवाय', असे जप करतच भाविक वाट चालतात। सोबतच तरुणांचे कितीतरी गट खांद्यावर कवडी घेऊन पूर्णा आईचे पाणी घेऊन लगबगीने राजेश्वराक...

वर्हाडातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे एक कारण : खारपान पट्टा - एक चिंतन!

नमस्कार मित्रांनो, मला खूप दिवसांपासून ह्या गोष्टीवर लिहायची इच्छा होती, पण जमले नाही. शेवटी आज लिहायला घेतले. अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा हे जिल्हे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे म्हणून ओळखले जातात. त्यातील बुलढाणा, अकोला व वाशीम हे कायम दुर्लक्षित जिल्हे असून येथील आत्महत्यांची संख्या खूप मोठी आहे. थोडे जवळ जाऊन बघितल्यावर ह्याचे एक प्रमुख कारण समजते - ह्या भागातील खूप मोठ्या प्रदेशावर असलेला खारपान पट्टा! हा खारपान पट्टा काय आहे, हे आपण समजून घेऊयात. १. पूर्णा नदी जेंव्हा सातपुडाच्या पर्वत रंगांतून खाली पठारावर  येते, तेंव्हा नदीच्या काठावरील बहुतेक प्रदेश हा खारपान पट्ट्यात येतो. उदा. मुर्तीजापूर, अकोला, अकोट, बाळापुर, तेल्हारा, बार्शीटाकळी, शेगाव, खामगाव, जळगाव जामोद, दर्यापूर,  संग्रामपूर, नांदुरा हे तालुके. ह्या भागातील जमीन ही क्षारयुक्त आहे. जमिनीतील पाणी अतिशय खारट (खारे) व क्षारयुक्त असते. हे पाणी जनावरे सुद्धा पिऊ शकत नाहीत. त्यामुळे ह्या भागात पिण्याच्या पाण्याचे खूप दुर्भि...