मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

|| मायमराठी - सद्यस्थिती व प्रगतीचे विवेचन !!

नमस्कार मित्रांनो, आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलूयात. खूप दिवसांपासून माझ्या मनात हा विषय आहे. मी ह्याच्यावर विचार करतो आहे, पण काही उपाय मिळत नव्हता. मग लक्षात आले कि ह्याला एक असा काही उत्तर नाहीये. आहेत काही उपाय पण ते कोणतेही १००% उपयुक्त नाहीत... तर ते सर्व उपाय सोबत अमलात आणावे लागतील.  आपण एक गोष्ट नेहमी ऐकतो - मराठी भाषेला कोणी वाली उरला नाही किंवा ती काही दिवसांत इतिहासजमा होणाच्या मार्गावर आहे. वगैरे वगैरे.. त्यावर काही लोक विरोध करतांना म्हणतात की आपल्या मराठी भाषा मारणार नाही तर ती वाढत जाईल.. फक्त शहरातले लोक इंग्रजी बोलतात पण संपूर्ण ग्रामीण भाग अजूनही मराठी बोलतो वगैरे वगैरे... मला वाटत की ह्या दोन्ही गोष्टी काही अंशी चुकीच्या आहेत व काही अंशी बरोबर! मराठी भाषिकच  कितीतरी लोक घोळक्यांत असतांना मराठी न बोलता इतर भाषा बोलतात, हे मी पहिले आहे. तसेच मराठी भाषेबरोबरच मराठी भाषिकांचा विकास करणे हे सुद्धा आपण लक्षात घेतले पाहिजे. आज आपण बघाल की बाहेर रस्त्याच्या कडेला किंवा कोलेज मध्ये किंवा इतर कुठल्याही ठिकाणी जर ५-१० लोक जमलेले असतील तर ते ब...

|| शेगाव व वर्हाडातील इतर देवस्थाने ||

मित्रांनो नमस्कार, आज जवळ जवळ महाराष्ट्रातील प्रत्येकाला शेगावीचे श्री. गजानन महाराज माहित असतील. अक्खा महाराष्ट्र श्री संत गजानन महाराजांना पुजतो व त्यांचे आशीर्वाद मागतो. महाराष्ट्र ही सदैव संतांची भूमी राहिली आहे. तरीही काही संत देवस्थानाशी पोहोचले व देवच होऊनी गेले. त्यांना श्री भगवंताचे रूप मानले गेले. जसे अक्कलकोटचे श्री. स्वामी समर्थ, शिर्डीचे श्री. साईबाबा, आळंदीचे श्री. ज्ञानेश्वर माउली, देहूचे श्री. संत तुकाराम महाराज. तसेच शेगावीचे श्री.  संत गजानन बाबा! मी जेंव्हा जेंव्हा शेगावला जातो, तेंव्हा तेंव्हा मला संपूर्ण महाराष्ट्रातून दर्शनासाठी आलेले भक्त दिसतात. महाराष्ट्राच्या काना कोपर्यातून (कोल्हापूर, सोलापूर, मुंबई, रत्नागिरी सारख्या ठिकाणांवरून ) इथे दर्शनासाठी आलेले भक्तगण पाहता अचंबा वाटतो... व शेगाव म्हणजे प्रती पंढरपुरच असे जाणवते! पण आपण संस्थानाच्या आत प्रवेश केल्यानंतर थोड्याच वेळात आपल्याला त्याचे कारण कळून चुकते. आत प्रवेशद्वारापासूनच संपूर्ण...

विश्वकापाची मोहीम फत्ते! सचिनला मनाचा मुजरा!!

नमस्कार मित्रांनो, बरेच दिवस झालेत मी ब्लोग्स्पोत वर आलो नाही. थोडा ऑफिस मध्ये बिझी होतो व शिवाय क्रिकेट वर्ल्ड कप सुरु झाल्यापासून तर मग खूपच बिझी झालो :) सर्वप्रथम आपण भारतीय टीमचे अभिनंदन करूयात... भारताने २८ वर्षांनतर पुन्हा मिळविलेला हा विश्व चषक, त्यासाठी जिंकलेली प्रत्येक मैच ही नेहमी लक्षात राहील. मुख्यत्वेकरून उपांत्य फेरीतील पाकिस्तान विरुद्धचा सामना तर विशेषच!  शिवाय सचिन चा हा विश्वकप, त्याची जिद्द, मेहनत, प्रामाणिकपणा हा तर खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. संपूर्ण भारताला हे विश्वकप जिंकून कृतकृत्य झाल्यासारखे वाटत असणार.  ह्या सामन्यात २ गोष्टी प्रकर्षाने जाणवल्यात:  १. सचिन ची जिद्द - सचिन हा एक वादातीत श्रेष्ट खेळाडू आहे. तो आज चाळीशीच्या जवळ असून देखील त्याची खेळण्यातली जिद्द, कामगिरी, चपलता हे गुण पाहून कोणीही थक्क होईल. इतके दिवस खेळून ऐन विशीतल्या तरुणासारखी कामगिरी करणे हे काही कुण्या ऐर्या गैर्याचे काम नव्हे. शिवाय त्याने प्रत्येकदा दाखवलेली प्रामाणिकपणा हा गुण खरोखर आपण सर्वांनी घेण्यासारखा आहे.  सचिनला आपणा सर्वांकडून खूप खूप अभिनंदन!  २. धोनी...