मुख्य सामग्रीवर वगळा

श्रावणातील अकोल्याचे राजराजेश्वर आणि कावड उत्सव !!

श्रावणातील अकोल्याचे राजराजेश्वर आणि कावड उत्सव !!

नमस्कार मित्रहो! खूप दिवसांपासून मी ब्लोगवर आलो नाहीये. मागच्या एक महिन्यात कार्यालयात खूप काम असल्यामुळे वेळच नाही मिळाला. आज खूप दिवसांपासून ब्लोग लिहायची इच्छा पूर्ण करतोय.
श्रावण महिना मला तसा खूपच आवडतो आणि मला खात्री आहे कि तुम्हा सर्वांना सुद्धा तो खूप आवडत असावा। पूर्वी   श्रावणातील दर सोमवारी अकोल्यातील श्रीराजराजेश्वर दर्शन करणे म्हणजे एक मुख्य काम असे।    आमचे आवडीचे... आणि आमचेच नाहीतर सर्व अकोलेकरांचे। श्रावणातील दर सोमवारी इथे एक   मोठा  उत्सवाच असतो। अकोलेकारांची भाविकता ह्यावेळेस प्रकर्षाने दिसून येते।



पतेच 4-5 वाजतापासून अकोलेकर आणि आजूबाजूच्या परिसरातील भाविक पायी मंदिराकडे जाण्यास निघतात। 'जय श्री राजराजेश्वर', ' जय भोले', 'ओम नमः शिवाय', असे जप करतच भाविक वाट चालतात। सोबतच तरुणांचे कितीतरी गट खांद्यावर कवडी घेऊन पूर्णा आईचे पाणी घेऊन लगबगीने राजेश्वराकडे धावत असतात।  अकोल्यात पूर्णा मायीचे पाणी आणून शिव शंकराला त्या पवित्र पाण्याने अभिषेक करण्याची प्रथा आहे। त्याला इथे कावड उत्सव असे नाव आहे। ह्यामध्ये श्रावणातील प्रत्येक सोमवारी इथून 20 किमी वर असलेल्या गांधीग्राम इथून पूर्ण नदीचे पाणी खांद्यावर कावडीने आणून राजेश्वाराला अभिषेक करतात. त्यात अकोला व परिसरातील 100 पेक्षा अधिक कावड संघ सहभागी होतात।
वाटेत आणि देवळात ह्या कावडधाऱ्यांना  चहा, प्रसाद, वैद्यकीय सेवा दिल्या जातात। हा उत्सव अकोलेकरांच्या मनात साठविलेला असतो।



अकोल्यातील राज्राजेश्वाराचे मंदिर हे पुरातन असून 600-700 वर्षांपूर्वीपासून असलेले सांगितल्या जाते। शिव पिंड सुद्धा जुनी खडकात कोरलेली आहे। ह्याबाबत एक दंतकथा प्रसिद्ध आहे। पूर्वी मोर्णा नदीकाठी आणि मंदिराच्या शेजारी असलेल्या किल्ल्यात अकोलसिंह  नावाचा राजा राहत होता। त्यावेळेस त्याची पत्नी राजराजेश्वराची भक्त होती। ती दररोज  सुर्योदयापूर्वी अंधारातच किल्ल्याबाहेर पडून महादेवाची पूजा करण्यासाठी जात असे। राजाला रोज ही सकाळी न सांगता बाहेर जात असल्यामुळे संशय आला आणि एके दिवशी रागाने तो पाठलाग करू लागला त्या दिवशी ती महादेवाच्या मंदिरात जात असल्याचे बघून तो संतापला आणि तिला मारण्यासाठी मागे धावला. राणी घाबरून राजेश्वराच्या धावा करू लागली। तेंव्हा तिची प्रार्थना ऐकून तिला वाचवण्यासाठी आपल्या पिंडीचे 2 भाग केले आणि राणीला आपल्यात सामावून घेतले. त्यात उडी मारतांना राणीच्या डोक्याचे काही केस खूप दिवासंपार्यता पिंडीच्या अर्ध्यातून दिसत होते असे म्हणतात।
असा हा राजराजेश्वर सर्व भक्तांवर दया करणारा आणि त्यांच्या अडचणीच्या वेळेस त्यांना धावून येणारा  देव आहे   अशी   सर्व अकोलेकारांची श्रद्धा  आहे।

तुम्हाला श्रावणात श्री राजराजेश्वराच्या दर्शनाला यायचे असल्यास अकोल्यात तुम्हाल रेल्वे, बस, खाजगी गाडीने पोहोचता येते। अकोला हे मुंबई-नागपूर रेल्वे मार्गावर मध्य रेल्वे मध्ये आणि सिकंदराबाद - इंदोर ह्या दक्षिण मध्य रेल्वे ने जोडलेले आहे। मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, नांदेड इ. ठिकाणांवरून सरळ ट्रेन्स आहेत.  तेंव्हा आमच्या राज राजेश्वराच्या दर्शनाला नक्की या आणि इथला कावड उत्सव अनुभवा .

जय श्री राजराजेश्वर!!

चला, ठीकाय,
अकोलकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

|| शेगाव व वर्हाडातील इतर देवस्थाने ||

मित्रांनो नमस्कार, आज जवळ जवळ महाराष्ट्रातील प्रत्येकाला शेगावीचे श्री. गजानन महाराज माहित असतील. अक्खा महाराष्ट्र श्री संत गजानन महाराजांना पुजतो व त्यांचे आशीर्वाद मागतो. महाराष्ट्र ही सदैव संतांची भूमी राहिली आहे. तरीही काही संत देवस्थानाशी पोहोचले व देवच होऊनी गेले. त्यांना श्री भगवंताचे रूप मानले गेले. जसे अक्कलकोटचे श्री. स्वामी समर्थ, शिर्डीचे श्री. साईबाबा, आळंदीचे श्री. ज्ञानेश्वर माउली, देहूचे श्री. संत तुकाराम महाराज. तसेच शेगावीचे श्री.  संत गजानन बाबा! मी जेंव्हा जेंव्हा शेगावला जातो, तेंव्हा तेंव्हा मला संपूर्ण महाराष्ट्रातून दर्शनासाठी आलेले भक्त दिसतात. महाराष्ट्राच्या काना कोपर्यातून (कोल्हापूर, सोलापूर, मुंबई, रत्नागिरी सारख्या ठिकाणांवरून ) इथे दर्शनासाठी आलेले भक्तगण पाहता अचंबा वाटतो... व शेगाव म्हणजे प्रती पंढरपुरच असे जाणवते! पण आपण संस्थानाच्या आत प्रवेश केल्यानंतर थोड्याच वेळात आपल्याला त्याचे कारण कळून चुकते. आत प्रवेशद्वारापासूनच संपूर्ण...

वर्हाडातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे एक कारण : खारपान पट्टा - एक चिंतन!

नमस्कार मित्रांनो, मला खूप दिवसांपासून ह्या गोष्टीवर लिहायची इच्छा होती, पण जमले नाही. शेवटी आज लिहायला घेतले. अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा हे जिल्हे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे म्हणून ओळखले जातात. त्यातील बुलढाणा, अकोला व वाशीम हे कायम दुर्लक्षित जिल्हे असून येथील आत्महत्यांची संख्या खूप मोठी आहे. थोडे जवळ जाऊन बघितल्यावर ह्याचे एक प्रमुख कारण समजते - ह्या भागातील खूप मोठ्या प्रदेशावर असलेला खारपान पट्टा! हा खारपान पट्टा काय आहे, हे आपण समजून घेऊयात. १. पूर्णा नदी जेंव्हा सातपुडाच्या पर्वत रंगांतून खाली पठारावर  येते, तेंव्हा नदीच्या काठावरील बहुतेक प्रदेश हा खारपान पट्ट्यात येतो. उदा. मुर्तीजापूर, अकोला, अकोट, बाळापुर, तेल्हारा, बार्शीटाकळी, शेगाव, खामगाव, जळगाव जामोद, दर्यापूर,  संग्रामपूर, नांदुरा हे तालुके. ह्या भागातील जमीन ही क्षारयुक्त आहे. जमिनीतील पाणी अतिशय खारट (खारे) व क्षारयुक्त असते. हे पाणी जनावरे सुद्धा पिऊ शकत नाहीत. त्यामुळे ह्या भागात पिण्याच्या पाण्याचे खूप दुर्भि...