मुख्य सामग्रीवर वगळा

सिकलसेल रुग्ण विदर्भात; प्रयोगशाळा मात्र मुंबई, पुण्यात!


नमस्कार,

मी आज सकाळच्या ई आवृत्तीतील  बातमी वचली आणि  मन सुन्न झाले. हे राज्यकर्ते कुठल्या थराला जाऊ शकतात तेच काळात नाहीये. अकोला, नागपूर आणि संपूर्ण विदर्भ, मराठवाड्याने कधी पर्यंत हा अन्याय सहन करायचा?  

विदर्भात सीकलसेल  रुग्णांची सन्ख्या 60 % असतांना आणि  नागपूर, अकोला, ऑरगाबाद आणि धुळे इ थे प्रयोगशाळा मन्जुर असतांना आता या प्रयोगशाळा मुंबई आणि पूणे ईथे हलवण्यात् येत आाहेत. का म्हणून? सिकलसेल हा रोग सहसा गरीब आणि आदिवासी लोकांमध्ये आढळून येतो. मग ह्या रुग्णांना चाचण्यांसाठी मुंबई आणि पुण्याला पाठवून हे राज्यकर्ते आणि प्रशासन काय साधणार आहे? 


बातमी खाली देत आहे:  

रुग्ण विदर्भात; प्रयोगशाळा मात्र मुंबई, पुण्यात!

सिकलसेल या अनुवांशिक आजाराचे अडीच लाख रुग्ण संपूर्ण राज्यात असून, एकट्या विदर्भात याचे प्रमाण दीड लाखांवर पोचले आहे. मात्र, यावरील प्रयोगशाळा पुणे, मुंबईत निर्माण करण्याच्या घाट राज्याच्या आरोग्य विभागाने रचल्याने बाधीत रुग्णांना चाचण्यांसाठी मुंबई, पुण्याची वारी करण्याची वेळ येणार आहे. सद्य:स्थित या आजाराने 19 जिल्ह्यांत पाय पसरलेत.

सिकलसेल हा जेनेटीक आजाराचा घटक म्हणून आरोग्य दप्तरी नोंद आहे. त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी नागपूर, अकोला, औरंगाबाद व धुळे येथे या प्रयोगशाळा निर्माण करण्याचे प्रस्तावित असताना मुंबई आणि पुणे येथे चार प्रयोगशाळा निर्माण होण्याचे संकेत मिळालेत. केंद्राच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत याची निर्मिती होणार आहे. प्रतियुनिट 42 लाख रुपयांचा खर्च या युनिटवर होणे अपेक्षित आहे. वास्ताविकत: ज्या भागात सिकलसेलचे प्रमाण जास्त आहे. त्या ठिकाणी ही प्रयोगशाळा झाल्यास रुग्णांना दिलासा मिळण्याचे प्रयोजन असतानाही राजकीय अधिकाऱ्यांच्या दबावामुळे मुंबई, पुण्याला संदर्भ देण्यात आला. भारतीय मानव विज्ञान संस्थेच्या सर्व्हेक्षणात राज्यभरात अडीच लाख इतकी रुग्ण संख्या आहे. या प्रयोगशाळा सेठ जीएस मेडिकल कॉलेज, केईएम मुंबई, सेठ जीएस मेडिकल कॉलेज, मुंबई तर बीजे मेडिकल कॉलेज, पुणे व आर्म फोर्स मेडिकल कॉलेज, पुणेमध्ये समाविष्ट करण्याच्या तयारीत शासन आहे. राज्यातून विरोध होऊ नये म्हणून पूर्वीच आगामी वर्षात तत्काळ हे युनिट स्वतंत्रपणे सुरू करण्याच्या धडपडीत आरोग्ययंत्रणा कामाला लागली आहे. परंतु, काही एनजीओंनी या प्रयोगशाळेला विरोध दर्शविला आहे. विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा येथे सर्वाधिक तर मराठवाड्यातील औरंगाबाद, नंदुरबार, नांदेड तर जळगाव, धुळे, नाशिक, ठाणे आणि रायगडात या रोगाचे कमी-अधिक प्रमाण पाहायला मिळते. सर्वाधिक रुणसंख्या ही विदर्भात असल्याचा निष्कर्ष मानव विज्ञान संस्थेच्या अहवालात नमूद आहे. आरोग्यक्षेत्रातही विदर्भाच्या वाटेला सापत्न वागणूक येत असल्याचा प्रत्यय या घटनेवरून येत सल्याने एनजीओंचा विरोध कायम आहे.

उपाययोजनेवरील 53 कोटी कुठे दडपले?
सिकलसेल आजाराचा 2007 ला राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनमध्ये समावेश करण्यात आला. मागील वर्षीपर्यंत 53 कोटी 53 लाख रुपयांचा निधी मिळाला. त्या निधीची काय विल्हेवाट लागली, याची खुद्द आकडेवारी आरोग्यविभागाकडेच उपलब्ध नाही. त्यामुळे उपाययोजनावर संशयाची सुई फिरत आहे.

केंद्राकडून मिळालेली रक्‍कम
2006-7 - 50 लाख
2007-8 - 1 कोटी 50 लाख
2008-9 - 3 कोटी 41 लाख
2009-10 - 10 कोटी 43 लाख
2010-11 - 16 कोटी 98 लाख 


बातमीची लिंक  -
http://online2.esakal.com/esakal/20120430/5437011189330199765.htm

Paper : esakal -> vidarbha
Date: Apr 30, 2012


धन्यवाद,
अकोलकर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

|| शेगाव व वर्हाडातील इतर देवस्थाने ||

मित्रांनो नमस्कार, आज जवळ जवळ महाराष्ट्रातील प्रत्येकाला शेगावीचे श्री. गजानन महाराज माहित असतील. अक्खा महाराष्ट्र श्री संत गजानन महाराजांना पुजतो व त्यांचे आशीर्वाद मागतो. महाराष्ट्र ही सदैव संतांची भूमी राहिली आहे. तरीही काही संत देवस्थानाशी पोहोचले व देवच होऊनी गेले. त्यांना श्री भगवंताचे रूप मानले गेले. जसे अक्कलकोटचे श्री. स्वामी समर्थ, शिर्डीचे श्री. साईबाबा, आळंदीचे श्री. ज्ञानेश्वर माउली, देहूचे श्री. संत तुकाराम महाराज. तसेच शेगावीचे श्री.  संत गजानन बाबा! मी जेंव्हा जेंव्हा शेगावला जातो, तेंव्हा तेंव्हा मला संपूर्ण महाराष्ट्रातून दर्शनासाठी आलेले भक्त दिसतात. महाराष्ट्राच्या काना कोपर्यातून (कोल्हापूर, सोलापूर, मुंबई, रत्नागिरी सारख्या ठिकाणांवरून ) इथे दर्शनासाठी आलेले भक्तगण पाहता अचंबा वाटतो... व शेगाव म्हणजे प्रती पंढरपुरच असे जाणवते! पण आपण संस्थानाच्या आत प्रवेश केल्यानंतर थोड्याच वेळात आपल्याला त्याचे कारण कळून चुकते. आत प्रवेशद्वारापासूनच संपूर्ण...

श्रावणातील अकोल्याचे राजराजेश्वर आणि कावड उत्सव !!

श्रावणातील अकोल्याचे राजराजेश्वर आणि कावड उत्सव !! नमस्कार मित्रहो! खूप दिवसांपासून मी ब्लोगवर आलो नाहीये. मागच्या एक महिन्यात कार्यालयात खूप काम असल्यामुळे वेळच नाही मिळाला. आज खूप दिवसांपासून ब्लोग लिहायची इच्छा पूर्ण करतोय. श्रावण महिना मला तसा खूपच आवडतो आणि मला खात्री आहे कि तुम्हा सर्वांना सुद्धा तो खूप आवडत असावा। पूर्वी   श्रावणातील दर सोमवारी अकोल्यातील श्रीराजराजेश्वर दर्शन करणे म्हणजे एक मुख्य काम असे।    आमचे आवडीचे... आणि आमचेच नाहीतर सर्व अकोलेकरांचे। श्रावणातील दर सोमवारी इथे एक   मोठा  उत्सवाच असतो। अकोलेकारांची भाविकता ह्यावेळेस प्रकर्षाने दिसून येते। पतेच 4-5 वाजतापासून अकोलेकर आणि आजूबाजूच्या परिसरातील भाविक पायी मंदिराकडे जाण्यास निघतात। 'जय श्री राजराजेश्वर', ' जय भोले', 'ओम नमः शिवाय', असे जप करतच भाविक वाट चालतात। सोबतच तरुणांचे कितीतरी गट खांद्यावर कवडी घेऊन पूर्णा आईचे पाणी घेऊन लगबगीने राजेश्वराक...

वर्हाडातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे एक कारण : खारपान पट्टा - एक चिंतन!

नमस्कार मित्रांनो, मला खूप दिवसांपासून ह्या गोष्टीवर लिहायची इच्छा होती, पण जमले नाही. शेवटी आज लिहायला घेतले. अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा हे जिल्हे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे म्हणून ओळखले जातात. त्यातील बुलढाणा, अकोला व वाशीम हे कायम दुर्लक्षित जिल्हे असून येथील आत्महत्यांची संख्या खूप मोठी आहे. थोडे जवळ जाऊन बघितल्यावर ह्याचे एक प्रमुख कारण समजते - ह्या भागातील खूप मोठ्या प्रदेशावर असलेला खारपान पट्टा! हा खारपान पट्टा काय आहे, हे आपण समजून घेऊयात. १. पूर्णा नदी जेंव्हा सातपुडाच्या पर्वत रंगांतून खाली पठारावर  येते, तेंव्हा नदीच्या काठावरील बहुतेक प्रदेश हा खारपान पट्ट्यात येतो. उदा. मुर्तीजापूर, अकोला, अकोट, बाळापुर, तेल्हारा, बार्शीटाकळी, शेगाव, खामगाव, जळगाव जामोद, दर्यापूर,  संग्रामपूर, नांदुरा हे तालुके. ह्या भागातील जमीन ही क्षारयुक्त आहे. जमिनीतील पाणी अतिशय खारट (खारे) व क्षारयुक्त असते. हे पाणी जनावरे सुद्धा पिऊ शकत नाहीत. त्यामुळे ह्या भागात पिण्याच्या पाण्याचे खूप दुर्भि...