मुख्य सामग्रीवर वगळा

अर्जुन - प्रत्येक मराठी तरुणाने व पालकांनी बघावा असा चित्रपट

नमस्कार  मित्रांनो,

मी आज 'अर्जुन' हा चित्रपट पहिला. प्रत्येक मराठी मुलाने व त्यासोबत पालकांनी पाहावा असा हा चित्रपट आहे. एक हुशार मराठी मुलगा समाजनिर्मित बंधने झुगारून कसा व्यवसाय व धंदा करतो व त्यात कुठल्या अडचणी येतात व त्यात तो मुलगा कसा यशस्वी होतो असा हा एक संपूर्ण चित्रपट आहे. त्यात मसाला आहे - रोमान्स आहे, मारामारी आहे, मस्त गाणे व सुंदर लावणी आहे व सर्वांत महत्त्वाचा असा एक संदेश आहे. 
हा चित्रपट बॉम्बे स्टोक एक्स्चेंज मध्ये मोठ्या स्क्रीन वर दाखविला गेला असे मी पेपर मध्ये वाचले आहे - प्रथमच एक चित्रपट व तोही मराठी चित्रपट इथे स्क्रीन केल्या गेला हेही नसे थोडके. 
मराठी तरुणायीला चांगले मार्गदर्शन व थोडी मदत मिळाल्यास तो काय करू शकतो हे (एक फिल्मी स्तयीलने) दाखविले आहे व ते खरे असेच आहे. त्यात दाखविलेल्या गोष्टी म्हणजे मराठी उद्योजकांनी / व्यावसायिकांनी न घाबरता उद्योग / व्यवसाय उभारावा व करावा. त्यात यशस्वी होण्यासाठी आपले नेटवर्क चांगले ठेवावे. गरज असेल तिथे सम, दंड, भेद ह्याचा उपयोग करावा व आपला धंदा यशस्वी करावा. तसेच स्पर्धेला घाबरू नये. 'आपले टार्गेट जेवढे मोठे तेवढाच तो मिळविल्याचा आनंद मोठा!'
ह्या चित्रपटातील गोष्ट साधी पण खूप मनोरंजक आहे. ते पाहून आणखी मराठी तरुणांना धंदा /व्यवसाय करायची इच्छा झाली पाहिजे. तसेच तो यशस्वी होण्यासाठी स्पुर्थी देखील मिळायला हवी. 
तेंव्हा मित्रांनो, हा चित्रपट पहा - चित्रपट गृहात / मल्टीप्लेक्स मध्ये जाऊन पहा.... पण पहा... बघा पटते का. 

राम राम,
अकोलकर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

|| शेगाव व वर्हाडातील इतर देवस्थाने ||

मित्रांनो नमस्कार, आज जवळ जवळ महाराष्ट्रातील प्रत्येकाला शेगावीचे श्री. गजानन महाराज माहित असतील. अक्खा महाराष्ट्र श्री संत गजानन महाराजांना पुजतो व त्यांचे आशीर्वाद मागतो. महाराष्ट्र ही सदैव संतांची भूमी राहिली आहे. तरीही काही संत देवस्थानाशी पोहोचले व देवच होऊनी गेले. त्यांना श्री भगवंताचे रूप मानले गेले. जसे अक्कलकोटचे श्री. स्वामी समर्थ, शिर्डीचे श्री. साईबाबा, आळंदीचे श्री. ज्ञानेश्वर माउली, देहूचे श्री. संत तुकाराम महाराज. तसेच शेगावीचे श्री.  संत गजानन बाबा! मी जेंव्हा जेंव्हा शेगावला जातो, तेंव्हा तेंव्हा मला संपूर्ण महाराष्ट्रातून दर्शनासाठी आलेले भक्त दिसतात. महाराष्ट्राच्या काना कोपर्यातून (कोल्हापूर, सोलापूर, मुंबई, रत्नागिरी सारख्या ठिकाणांवरून ) इथे दर्शनासाठी आलेले भक्तगण पाहता अचंबा वाटतो... व शेगाव म्हणजे प्रती पंढरपुरच असे जाणवते! पण आपण संस्थानाच्या आत प्रवेश केल्यानंतर थोड्याच वेळात आपल्याला त्याचे कारण कळून चुकते. आत प्रवेशद्वारापासूनच संपूर्ण...

श्रावणातील अकोल्याचे राजराजेश्वर आणि कावड उत्सव !!

श्रावणातील अकोल्याचे राजराजेश्वर आणि कावड उत्सव !! नमस्कार मित्रहो! खूप दिवसांपासून मी ब्लोगवर आलो नाहीये. मागच्या एक महिन्यात कार्यालयात खूप काम असल्यामुळे वेळच नाही मिळाला. आज खूप दिवसांपासून ब्लोग लिहायची इच्छा पूर्ण करतोय. श्रावण महिना मला तसा खूपच आवडतो आणि मला खात्री आहे कि तुम्हा सर्वांना सुद्धा तो खूप आवडत असावा। पूर्वी   श्रावणातील दर सोमवारी अकोल्यातील श्रीराजराजेश्वर दर्शन करणे म्हणजे एक मुख्य काम असे।    आमचे आवडीचे... आणि आमचेच नाहीतर सर्व अकोलेकरांचे। श्रावणातील दर सोमवारी इथे एक   मोठा  उत्सवाच असतो। अकोलेकारांची भाविकता ह्यावेळेस प्रकर्षाने दिसून येते। पतेच 4-5 वाजतापासून अकोलेकर आणि आजूबाजूच्या परिसरातील भाविक पायी मंदिराकडे जाण्यास निघतात। 'जय श्री राजराजेश्वर', ' जय भोले', 'ओम नमः शिवाय', असे जप करतच भाविक वाट चालतात। सोबतच तरुणांचे कितीतरी गट खांद्यावर कवडी घेऊन पूर्णा आईचे पाणी घेऊन लगबगीने राजेश्वराक...

वर्हाडातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे एक कारण : खारपान पट्टा - एक चिंतन!

नमस्कार मित्रांनो, मला खूप दिवसांपासून ह्या गोष्टीवर लिहायची इच्छा होती, पण जमले नाही. शेवटी आज लिहायला घेतले. अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा हे जिल्हे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे म्हणून ओळखले जातात. त्यातील बुलढाणा, अकोला व वाशीम हे कायम दुर्लक्षित जिल्हे असून येथील आत्महत्यांची संख्या खूप मोठी आहे. थोडे जवळ जाऊन बघितल्यावर ह्याचे एक प्रमुख कारण समजते - ह्या भागातील खूप मोठ्या प्रदेशावर असलेला खारपान पट्टा! हा खारपान पट्टा काय आहे, हे आपण समजून घेऊयात. १. पूर्णा नदी जेंव्हा सातपुडाच्या पर्वत रंगांतून खाली पठारावर  येते, तेंव्हा नदीच्या काठावरील बहुतेक प्रदेश हा खारपान पट्ट्यात येतो. उदा. मुर्तीजापूर, अकोला, अकोट, बाळापुर, तेल्हारा, बार्शीटाकळी, शेगाव, खामगाव, जळगाव जामोद, दर्यापूर,  संग्रामपूर, नांदुरा हे तालुके. ह्या भागातील जमीन ही क्षारयुक्त आहे. जमिनीतील पाणी अतिशय खारट (खारे) व क्षारयुक्त असते. हे पाणी जनावरे सुद्धा पिऊ शकत नाहीत. त्यामुळे ह्या भागात पिण्याच्या पाण्याचे खूप दुर्भि...