नमस्कार मित्रांनो....
जपानच्या ईशान्य भागात रिश्टर स्केल वर ९.० घटकांचा भूकंप आला... आणि तेथील लोकांवर काळ आला.... बापरे किती हानी... किती नुकसान!! तेथील फुकुशिमा व सेनदाय सारखे भाग तर टी. व्ही / इंटरनेट वर पाहूनही घाम फुटतो... संपूर्ण शहरे बेचिराख झाले... रस्त्याला भेगा पडल्या... घर वाहून गेलेत, गाड्या वाहून गेल्यात, हजारो लोक मेलेत, जे वाचले, त्यांना दुखापती झाल्यात... होत्याचे नव्हते झाले....
जपान हा चिंचोळा देश चीन आणि अमेरिकेच्या मध्ये पासिफिक महासागरात वसला आहे... तो भूकंप-क्रियाशील (high seismic active region) भागामध्ये वसला आहे.. तसा ह्या देशाला छोटे मोठे भूकंप होताच असतात.. त्यात लोकांनाही काही भीती वाटत नाही.. येथील घरे, कार्यालये, शहरे, हे भूकंपरोधक यंत्रणेने युक्त असतात.. पण त्यांनीही कधी येवढा भयंकर भूकंप व सुनामी येईल अशी कल्पना केली नसेल...
ह्या घटनेने काही गोष्टी मात्र प्रकर्षाने समोर आल्यात...
१. निसर्ग ही खूप मोठी शक्ती आहे. माणसाने कधीही निसर्गाला ग्रंतेड पकडू नये... जेवढे जीवन निसर्ग वर्षानुवर्ष देतो तेवढेच तो काही क्षणातच परत घेऊ शकतो..... माणसाने सदैव सगळ्यांत खराब गोष्टीसाठी तयार असावे. आपण खूप प्रगती केली आहे व निसर्ग आता आपल्या ताब्यात आहे अशा गमजा तर मुळीच करू नयेत.
२. जपानने ज्या धीराने व थंड डोक्याने परिस्तिथी हाताळली आहे, ते शिकण्यासारखे आहे. जपानने उत्तम प्रशासनाचा एक आदर्शाच आपल्या समोर ठेवला आहे असे मला वाटते. प्रशासनाची कुठे उगाच गोंधळ नाही, मारामार नाही... आलेल्या परिस्तिथीतून समोर असलेल्यान पैकी योग्य मार्ग पत्करून आपले काम केले आहे. अनु उर्जेच्या भट्टीतून येवू शकणारा धोका वेळीच ओळखून त्यांनी लगेच अमेरिकेला सांगून जड पाणी (जे अनु-भट्टीत उपयोग केले जाते ), ते वेळीच मागून घेतले. शिवाय आपले सर्व पर्याय उघडे ठेवून तयारी केली...
अशा परीस्तीथित योग्य धोका ओळखून, शेवटी समुद्री पाणी भट्टीमध्ये फेकणे, तेही विनाविलंब, हेही नसे थोडके... हे आपण करू शकलो असतो का ह्याबद्दल मलातरी शंका वाटते.. मुंबईतील ५ जुलैच्या पावसातच पूर्ण मुंबई शहर अक्षरशः थांबून गेले होते... त्या दिवशी मी संपूर्ण रात्र बेस्ट च्या बस मध्ये बसून काढली पण मला कुठेहि पोलीस किंवा सरकारी यंत्रणा काम करतांना दिसली नाही.. आम्हीच लोक व आजूबाजूचे राहणारे (अगदी बहुसंख्येने मराठी लोक) लोकच अडकलेल्या लोकांना चहा, सामोसे, वाद पाव, वाटत होते.. ते पाहून आम्हीही काही जन, आजूबाजूला असलेल्या म्हातार्या लोकांना आधी ते देऊन व त्यांना काही लागल्यास मदत करून कसेतरी रात्र काढली...
हे सर्व पाहून, मला तरी खरोखर असे वाटते कि सरकारने जैतापुराला अनु-प्रकल्प उभारू नये.. आपल्याला विजेची खूप गरज आहे व अनु-उर्जा ही एक स्वच्छ उर्जा आहे, हे सर्व ठीक आहे, पण आपल्याजवळ अशा गोष्टी झाल्यास त्याला समर्थपणे तोंड देणारी यंत्रणा नक्कीच नाही व ती नजीकच्या भविष्यात होणारही नाही... त्यैवजी आपण सौर उर्जा, वायू उर्जा व जल उर्जेच्या माध्यमातून आपली गरज भागविण्याचा प्रयत्न करावा असे मला वाटते.. हे सर्व पर्याय खूपच खर्चिक व जास्त काळ घेणारे आहेत, हे नक्कीच.. पण तरीही तो पर्याय आतातरी सगळ्यांना मान्य असेल असे वाटते.. नाही का?
चला मी आता थांबवतो... परमेश्वराने जपानला मदत करावी व जपानी लोकांची अजून जास्त परीक्षा पाहू नये...
आभार,
अकोलकर




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा